Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह ६ राज्यांच्या गृहसचिवांना निवडणूक आयोगाने हटवले

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह ६ राज्यांच्या गृहसचिवांना निवडणूक आयोगाने हटवले

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच निवडणूक आयोगामध्येही (Election Commission) अनेक बदल केले जात आहेत. त्यात निवडणूक आयोगाने आज सोमवारी गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांच्या गृहसचिवांना हटवले आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे पोलीस प्रमुख यांना देखील हटवले आहे. विशेष बाब म्हणजे यात बृहन्मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश दिले आहेत.

चहल यांची बदली करण्यात आली आहे. चहल यांची बदली रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मागणी करण्यात आली होती. पण राज्य सरकारच्या मागणीला निवडणूक आयोगाने धुडकावून लावले.

राज्य सरकारकडून आयुक्त इक्बाल चहल यांची बदली टाळण्यासाठी तीन वर्षांचा नियम लागू करु नये, अशी मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.

अर्थातच राज्य सरकारची ही मागणी फेटाळल्यामुळे आता मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि दुसऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच ठिकाणी पदांवर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश दिला आहे. या नियमांतर्गत मुंबई महापालिकेच्या इतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखिल होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -