Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेभिवंडीत गोदामांना भीषण आग; १० गोदामे जळून खाक

भिवंडीत गोदामांना भीषण आग; १० गोदामे जळून खाक

मोनिश गायकवाड

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नित्याच्या झाल्या असून बुधवारी सकाळी सहा वाजता पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंड येथील खाद्य तेल व औषधे साठविलेल्या गोदाम इमारतीस आग लागून दहा गोदामे जळून खाक झाली आहेत.

तळ अधिक एक मजली या इमारतीत टोरेंट फार्मास्युटीकल्स कंपनीचे गोदाम असून तेथे तळमजल्यावर खाद्य तेल, तर पाहिल्या मजल्यावर औषध साठा साठविलेला होता. या आगीत उग्र रूप धारण करीत गोदामातील संपूर्ण साठा जळून जात असतानाच आगीच्या धगीमुळे संपूर्ण इमारत मागील बाजूस कोसळून तेथील चाळीचे नुकसान झाले आहे.

आगीची महिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन, तर आगीची व्याप्ती वाढल्याने कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार फायर फायटर गाड्यांनी स्थानिक पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग सात तासांनी आटोक्यात आली. या आगीच्या ज्वालांनी या गोदाम इमारतीचा मागील संपूर्ण हिस्सा मागील बाजूस असलेल्या सुशांत चौधरी यांच्या चाळीवर कोसळला, त्यामुळे चाळीतील दोन खोल्यांचे नुकसान झाले असून एक दुचाकी ढिगाऱ्या खाली गाडली गेली.

या दुर्घटनेनंतर स्थानिक तलाठी सुधाकर कामडी, यांनी पूर्णा ग्रामपंचायत व नारपोली पोलीस यांच्या मदतीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -