Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी!

Devendra Fadnavis : आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी!

काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सणसणीत टीका

सांगली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते उन्हातानात सभा घेत विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यांनी सभेला संबोधित करताना शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी (Naremdra Modi) यांनी काय केले?, अशी टीका शरद पवारांनी अनेकदा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत ‘काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं’, अशी खोचक टीका केली. शिवाय ‘आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार आहेत. या उमेदवारांची ही निवडणूक नाही. या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्याय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वांमधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावले आहेत. ही आपल्या विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे. विरोधकांकडे काय अवस्था आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुढे ते म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, तर शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन. आता त्यांच्याकडे कोणीही डब्बे लावायला तयार नाही. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये जनतेसाठी जागा नाही. काँग्रेसच्या सरकारने अनेक वर्षे राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगली. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

“ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी यांना उसाच्या शेतीबाबत काय कळतं. नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळतं. मात्र, आज दहा वर्षांनंतर मी दाव्याने सांगतो, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -