Friday, May 10, 2024
Homeमहत्वाची बातमीविना मास्क प्रकरणी १०० जणांवर कारवाई

विना मास्क प्रकरणी १०० जणांवर कारवाई

भाईंदर : नवघर पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून मिरा-भाईंदर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. नवघर पोलिसांनी गोडदेव नाका, नवघर नाका, फाटक रोड, भाईंदर स्टेशन परीसरात नाकाबंदी करत जवळपास दिवसभरात १०० हून अधिक जणांवर कारवाई केली. त्यांच्या कडून दंड वसूल करत त्यांना पावती देण्यात आली असल्याची माहिती नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दिली.

विना मास्क फिरणाऱ्यांना यापुढे मास्कचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -