Friday, May 10, 2024
HomeUncategorizedपटोलेंनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले

पटोलेंनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले

केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली तर युवराज राहुल गांधी खुश होतात, हे ठाऊक असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बरळू लागले आहेत. मात्र आपल्या बरळण्यामुळे आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाच खोटे ठरवत आहोत याचे भान नाना पटोले यांना राहिलेले नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

उपाध्ये यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलताना नाना पटोले यांनी आपली पात्रता तपासून घ्यावी, असे आम्ही सुचवणार नाही. घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार पटोलेंना आपले मत व्यक्त करण्याचे पुरेपूर स्वातंत्र्य आहे. मात्र विचार करून बोलणे आणि बरळणे यातील फरक त्यांच्या लक्षात आलेला नाही.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाईबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त पटोलेंच्या वाचण्यात आले नसावे. हे वृत्त वाचले असल्यास त्याचा अर्थ त्यांच्या लक्षात आला नसावा. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाल्याचे खुद्द सोनिया गांधी मान्य करत आहेत. पटोले मात्र सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाली नसल्याचेच वारंवार सांगत आहेत, असे उपाध्ये म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -