Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाकसोटी सामन्यांची संख्या वाढवणे गरजेचे

कसोटी सामन्यांची संख्या वाढवणे गरजेचे

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचे वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर याबाबत बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “यावर्षी आमच्याकडे दोन कसोटी सामने आहेत, एक इंग्लंडविरुद्ध आणि एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि मला आशा आहे की या सामन्यांचा महिला क्रिकेटवर मोठा प्रभाव पडेल. मात्र, आताच्या काळात एवढेच सामने पुरेसे नाहीत त्यामुळे कसोटी सामन्यांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. एका क्रीडा ग्रुपने हरमनप्रीतशी संवाद साधला. त्यावेळी तिने कसोटी क्रिकेटची निकड व्यक्त केली.

भारतीय महिला संघ २०२२-२५ दरम्यान चालणाऱ्या वर्तमान फ्यूचर टूर्स प्रोग्राम चक्रामध्ये सर्वात लांब फॉरमॅटमध्ये स्पर्धा करणाऱ्या चार संघांमध्ये सर्वात कमी कसोटी सामने खेळणारा फक्त भारतीय संघ आहे. बाकी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे भारतापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणार आहेत. या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत म्हणाली की, कसोटी क्रिकेट स्वरूपातील अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामने खेळले जायला पाहिजेत. आगामी काळात टीम इंडिया फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धचा कसोटी मालिका खेळणार आहे.

हरमनप्रीत म्हणाली की, आम्हाला महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामने परत आणावे लागतील. कारण महिला क्रिकेटसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. २०२३-२४ हंगामात भारताला मायदेशात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. संघाने याआधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. सध्याच्या एफटीपीमध्ये इंग्लंड सर्वाधिक पाच कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका चार आणि तीन कसोटी खेळणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -