Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीबिहारमध्ये भीषण रस्ते अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये भीषण रस्ते अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू

पाटणा: बिहारच्या(bihar) लखीसराय येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे घडलेल्या भीषण रस्ते अपघातात(road accident) ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामगढचौक ठाणे क्षेत्रातील बिहरौरा गावातील घटना. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला.

येथे १५ लोक ऑटोमून जात होते. त्याचवेळेस अज्ञात वाहनाने या ऑटोला टक्कर दिली. या घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ७ जण जखमी झाले. आसपासच्या लोकांनी ही सूटना पोलिसांना दिली.

या घटनेची सूचना आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. मृत तसेच जखमी व्यक्तींची ओळख पटलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -