Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीलग्नातील दागिने चोरीप्रकरणी ३ अटकेत

लग्नातील दागिने चोरीप्रकरणी ३ अटकेत

इगतपुरी: मुंबईतील लग्नांमध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना इगतपुरी पोलिसांनी अटक केली असून अन्य एक आरोपी फरार झाला आहे. मुंबईतील केपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्न सोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत ताराचंद केवलचंद बबेरवाल (रा. घोटी) यांनी फिर्याद दाखल केली होती.

इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी तातडीने शोध पथक नेमून महाराष्ट्र पोलीस व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला. परिसरातील फोटो शुटींगच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपी व त्यांचे मोबाईल नंबर मिळविण्यात आले. तपासाची चक्र वेगाने फिरवत असताना संबंधित आरोपी मुंबई जवळच्या मिरा – भाईंदर परीसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी काशिमीरा पोलीसांची या तपासकामी मदत घेत घटनेतील आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले. तीन आरोपी हाती लागले असून त्यापैकी अन्य एकाने पळ काढला. तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपीना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.

सुमारे ६ लाख ११ हजार रूपये किंमतीचे चोरी झालेल्या दागिन्यांपैकी पैकी ५ लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडे सापडला. या घटनेतील आरोपी अतिश अमर सिसोदिया, (२० , रा. जिल्हा राजगड, मध्यप्रदेश), निखिल रवी सिसोदिया, (१९ रा. पिपलीया, मध्यप्रदेश), करण महावीर सिंग, (२३ , रा. जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश) तर चौथा आरोपी विकास सालकराम सिसोदिया हा फरार असून पोलीस शोध घेत आहे. इगतपुरी पोलीसांनी केवळ महाराष्ट्र पोलीस व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे अट्टल गुन्हेगारांचा शोध ४८ तासांत लावल्याने इगतपुरी पोलीसांचे अभिनंदन होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -