Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाT-20 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द

T-20 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० (T-20) सामना आज वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र नाणेफेकीवेळीच पावसाने हजेरी लावली. पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्येच हतबल होऊन बसले होते. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी १२ वाजता सुरुवात होणार होती. यापूर्वी अर्धातास नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात येणार होते.

T-20 : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

परंतु, पावसामुळे नाणेफेकही होऊ शकले नाही. हा सामना थोड्या उशीराने सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, वेलिंग्टन येथील सध्याचे वातावरण आणि हवामानाचा अंदाज पाहता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -