मुंबई: आचार्य चाणक्य यांनी माणसाच्या या चुकांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे ती व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. या चुका माणसाची प्रगती रोखतात. त्या व्यक्तीने प्रयत्न जरी केले तरी ते यशस्वी होऊ शकत नाहीत.
आचार्य चाणक्य यांच्या मते पैशांची बचत आयुष्यात अतिशय महत्त्वाची आहे. कारण बचत केलेली रक्कमच वेळेला वापरता येते.
चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती पैशांची बचत करत नाही ती नेहमी आर्थिक समस्येने ग्रस्त असते.
चाणक्य सांगतात व्यक्तीने नेहमी मेहनती आणि इमानदारीसोबत पुढे जात राहिले पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्ती चुकीच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्या कधीच यशस्वी होत नाहीत.
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार व्यक्तीने आपल्या आयुष्यात नेहमी एक ध्येय ठेवले पाहिजे. मात्र हे ध्येय कोणालाही सांगू नये.
अनेकजण आपल्या ध्येयाबद्दल दुसऱ्या लोकांना सांगतात. मात्र असे केल्याने त्यांनाच नुकसान होते.
आचार्य चाणक्य यांच्या मते आपले ध्येय इतर लोकांना सांगितल्याने ते पूर्ण होण्याची शक्यता कमी होते.