Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीHealth Tips: जेवण हाताने जेवले पाहिजे की चमच्याने? काय आहे फायदेशीर

Health Tips: जेवण हाताने जेवले पाहिजे की चमच्याने? काय आहे फायदेशीर

मुंबई: हाताने जेवण्याचा काही आनंदच वेगळा असतो. अनेकदा घरातली वडीलधारी मंडळी हाताने जेवण्याबाबत सांगत असतात. मात्र आजकाल हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये अनेकजण लोक चमच्याने खाऊ लागले आहेत. भारतीय परंपरेमध्ये जेवण नेहमी जमीनीवर बसून हाताने खाल्ले जाते. जर तुम्हीही जेवण हाताने जेवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हाताने जेवण करण्याबाबत काय सांगते आयुर्वेद

आयुर्वेदानुसार हाताने जेवण करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पाचही इंद्रिये आणि पचनासाठी हे चांगले असते. आयुर्वेद सांगते की आपली पाच बोटे पाच विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. अशातच जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा जेवणाला बोटांचा स्पर्श होतो आणि आपल्या मेंदूला असा मेसेज पाठवला जातो की आपण जेवणासाठी तयार आहोत. यामुळे पाचनक्रिया सतर्क होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

काय म्हणते विज्ञान?

विज्ञानातही हाताने जेवण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. हाताने जेवण केल्याने पचन सुधारते. कारण हातामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे हानिकारक नसतात मात्र पर्यावरणातील विविध हानिकारक किटाणूंपासून ते शरीराची सुरक्षा करतात. दरम्यान, जेवणाआधी हात व्यवस्थित धुतले पाहिजेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -