Thursday, May 9, 2024
Homeदेशश्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीर : रविवारी पहाटे शहरातील हरवान (Harvan, Kashmir) भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LET)चा दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवानमध्ये शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी (Terrorists) जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं रुपांतर चकमकीत झालं.

दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारामुळे जवानांनी देखील प्रत्यूत्तरादाखल गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मागच्या ३३ दिवसांत श्रीनगरमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस, एसएफवरील हल्ले आणि नागरिकांच्या हत्येसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. खोऱ्यातील, विशेषतः श्रीनगरमधील शांतता बिघडवण्यामागे पाकिस्तानी शक्ती असल्याचे यावरून दिसून येतं असल्याचं काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं.

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सैफुल्ला, अबू खालिद आणि शवाज या तिघांचा समावेश असून, तिघेही पाकिस्तानच्या कराचीचे रहिवासी आहेत. हे सर्व लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत. त्यांनी २०१६ मध्ये घुसखोरी करून हरवानच्या सामान्य भागात वेगवेगळ्या कारवाया केल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -