Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीमालगाडीचे डब्बे घसरल्याने रेल्वे सेवा ठप्प

मालगाडीचे डब्बे घसरल्याने रेल्वे सेवा ठप्प

पालघर : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी ५ ते ६ डब्बे घसरल्याने गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्टेशनवरती पलटी झाली आहे. मालगाडीचा अपघात इतका भीषण होता की, दोन क्रमांकाचा रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही डब्बे घसरले आहेत तर काही डब्बे पुर्णपणे पलटी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. ही मालगाडी मुंबईकडे जात असताना ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून चौथ्या रुळावर क्रॉसिंग करत असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी नसली तरी मालगाडीचे डबे रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वेची मुंबईकडील वाहतूक कोलमडली.

घसरलेली मालगाडी पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह नागरिकांची मोठी गर्दी केली होती. विरारहून डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -