Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाजसप्रीत बुमराह रांचीला नाही पोहोचला, चौथ्या कसोटीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान?

जसप्रीत बुमराह रांचीला नाही पोहोचला, चौथ्या कसोटीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी रांचीला पोहोचले. रोहित शर्मा अँड कंपनी संध्याकाळी ४ वाजता बिरसा मुंडा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा एक गोष्ट पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या क्रिकेटर्ससोबत जसप्रीत बुमराह नव्हता. केएल राहुलही संघासोबत नव्हता मात्र तो नंतर टीम इंडियासोबत येण्याची आशा आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. या कारणामुळे रांची कसोटी सामन्यात करो वा मरो या स्थितीत असणार आहे. भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवायचा असेल तर त्यांना रांची कसोटी जिंकावी लागेल.

भारत आणि इंग्लंडचे संघ प्रायव्हेट जेटने राजकोटमध्ये पोहोचले. यात खास बाब म्हणजे जसप्रीत बुमराह संघासोबत नव्हता. असे मानले जात आहे की जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकता.

भारतीय संघ – रोहित शर्मा(कर्णधार), जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, केएस भरत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.glan

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -