अहमदाबाद: आस्ट्रेलिया(australia) आणि अफगाणिस्तानला(afganistan) विश्वचषकात हरवल्यानंतर टीम इंडियाचा १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.
भारतीय संघाने विश्वचषकातील पहिले दोनही सामने जिंकले आहेत त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र अद्यापही संघात काही कमतरता आहेत. या कमतरता दूर झाल्या तर टीम इंडियाचे विजयी अभियान असेच सुरू राहू शकते आणि वर्ल्डकपचा दावेदारही संघ बनू शकतो.
सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाला काही बाबतीत सुधारण्याची गरज आहे. जर सुरूवातीला इशान किशनबाबत बोलायचे झाल्यास दिल्ली येथील सामन्यात त्याने ४७ धावा केल्या. मात्र त्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वासाठी कमतरता जाणवली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो खूपच गैरजबाबदार दिसला.
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ३९ धावा देत ४ विकेट मिळवल्या होत्या मात्र गोलंदाजीत दुसरीकडे त्याचा पार्टनर मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई झाली. त्याने आपल्या ९ ओव्हरमध्ये ७६ धावा दिल्या होत्या. अशातच मोहम्मद शमीला सिराजच्या जागी संधी दिली जाऊ शकते.