मुंबई: टीम इंडिया(team india)ने आजच्याच दिवशी म्हणजेच २ एप्रिल २०११ रोजी फायनलमध्ये श्रीलंकेला हरवत वनडे वर्ल्डकपचा(oneday world cup) दुसरा खिताब जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने वनडे वर्ल्डकप २०११(ODI World Cup 2011) चा खिताब आपल्या नावे केला होता. गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि कर्णधार धोनीची नाबाद ९१ धावांच्या खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला होता.
मुंबईच्या वानखेडे मैदानावरील धोनीचा तो विजयी षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या ठणठणीत लक्षात आहे. या विजयासोबतच तब्बल २८ वर्षांनी भारताने पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप हातात घेतला होता. याआधी १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०११मध्ये धोनीच्या धुरंधरांनी २८ वर्षांनी या खिताबावर आपले नाव कोरले होते.
INDIA WON THE WORLD CUP ON THIS DAY IN 2011..!!!! 🇮🇳
Dream for 28 years ended under the leadership of MS Dhoni – the winning six will be remembered forever from the Captain – A team effort through the tournament with Dhoni & Gambhir heroes in final. 🏆pic.twitter.com/qZdPGHHfl2
— Johns. (@CricCrazyJohns) April 1, 2024
या सामन्यात कर्णधार धोनीला प्लेयर ऑफ दी मॅचने सन्मानित करण्यात आले होते. तर युवराज सिंह प्लेयर ऑफ दी सीरिज ठरला होता. हा वर्ल्डकप अविस्मरणीय असाच आहे. यानंतर आतापर्यंत टीम इंडियाला कोणताही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.
असा रंगला होता फायनलचा सामना
वानखेडे मैदानावर फायनल सामन्यात श्रीलंका पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरली होती. त्यांनी ५० षटकांत ६ विकेट गमावत २७४ धावा केल्या होत्या. संघासाठी महेला जयवर्धनेने ८८ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी साकारली होती. याशिवाय कुमार संगकाराने ६७ बॉलमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या होत्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४८.२ षटकांत विजय आपल्या नावे केला होता. संघासाठी गौतम गंभीरने १२२ बॉलमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ९७ धावांची मोठी खेळी केली होती. याशिवाय धोनीने ७९ बॉलमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. धोनीसोबत युवराज सिंहने २४ बॉलमध्ये २ चौकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या होत्या.