Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरप्रधानमंत्री यांनी साधला देशातील अनाथ बालकांशी संवाद

प्रधानमंत्री यांनी साधला देशातील अनाथ बालकांशी संवाद

जिल्हा प्रशासन शिक्षणामध्ये खंड पडू देणार नाही; डॉ. माणिक गुरसळ यांनी बालकांना दिला धीर

पालघर (प्रतिनिधी) : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.

तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला.

जिल्हाधिकारी श्री. गुरसळ यांनी यावेळी बालकांना जिल्हा प्रशासन शिक्षणात खंड पडू देणार नाही असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम भविष्य निर्माण करा, असा सल्ला दिला. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. मात्र शिक्षण ऑनलाइन सुरू होते आता जूनपासून नविन शैक्षणीक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत.

त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाज आपल्यासोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बालकांना धीर देताना सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -