Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाBabar Azam: विश्वचषकातील पाकिस्तानच्या कामगिरीनंतर कर्णधारपद सोडणार बाबर?

Babar Azam: विश्वचषकातील पाकिस्तानच्या कामगिरीनंतर कर्णधारपद सोडणार बाबर?

मुंबई: पाकिस्तानचा(pakistan)3 संघ विश्वचषक २०२३मधून(world cup 2023) बाहेर जाला आहे. सेमीफायनलमध्ये खेळण्याच्या त्यांच्या आशा शनिवारी इंग्लंडविरुद्ध टॉस हरण्यासोबतच संपल्या होत्या. पाकिस्तानच्या संघाला ९ सामन्यात आज ४ विजयांसह मायदेशी परतत आहेत.

या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांची ट्रेन रूळावरून घसरली. या स्पर्धेत जेव्हा पाकिस्तानने एकामागोमाग एक सामने गमावले जेव्हा बाबरच्या हातून कर्णधारपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता जेव्हा पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हानच संपले आहे त्यामुळे सर्वाधिक चर्चा संघाच्या नेतृत्व परिवर्तनाची होत आहे.

बाबर स्वत: कर्णधारपद सोडणार नाही

पीटीआयशी बोलाताना पीसीबीच्या एका सूत्रांनी सांगितले, बाबरने याआधी आपल्या सहकारी खेळाडूंशी बातचीत केली आहे. अनेक खेळाडूंनी त्याला स्वत:हून पद न सोडण्याचा सल्ला दिला आहे. विश्वचषकात सेमीफायनलमध्ये जागा बनवू न शकल्याने संघासोबत माघारी परतण्याने निश्चितच बाबरवर कारवाई होऊ शकते. मात्र तो स्वत: कर्णधारपद सोडणार नाही.

२०१९मध्ये कर्णधार बाबर बनला होता कर्णधार

बाबरने २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या वनडे संघाची कमान सांभाळली होती. त्याला सरफराज खानच्या जागी रिप्लेस करण्यात आले होते. यानंतर २०२१मध्ये त्याला कसोटी कर्णधारपद मिळाले. टी-२० वर्ल्डकप २०२२मध्ये त्याने आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -