Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या वादातून एका पोटच्या आईनेच आपल्या २० वर्षीय तरुण मुलीची दुपट्ट्याने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी आईला अटक केली असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ, रेल्वे, स्वयंसेवक आणि गर्दी व्यवस्थापन ...
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उल्हासनगर-१ मधील भय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. येथे राहणारी २० वर्षीय मृताचे नाव अमृता गरड असे असून, तिची आई आशा गरड हिच्यासोबत हा वाद झाला होता. अमृताचे दुसऱ्या जातीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, आई आशा गरड यांचा या प्रेमप्रकरणाला तीव्र विरोध होता. यावरून अनेकदा कुटुंबात वादही झाले होते.
४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट संपून लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी ...
रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास याच मुद्यावरून आई आणि मुलीमध्ये पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली. ज्या वेळी हा वाद सुरू होता, त्या वेळी घरातील इतर सदस्य, विशेषतः अमृताचे वडील आणि दोन भाऊ गाढ झोपेत होते. वादानंतर संतापलेली अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच, परिस्थिती अधिकच बिघडली. रागाच्या भरात आणि कुटुंबाच्या इज्जतीच्या नावाखाली आई आशा गरड हिने टोकाचे पाऊल उचलत जवळ असलेल्या दुपट्ट्याने अमृताचा गळा आवळला. या अचानक झालेल्या हल्ल्यात आणि श्वास अडकल्यामुळे अमृताचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर प्रवास त्रासदायक असेल, तर आपला सगळा वेळ ...
वडिलांचे धाडस आणि पोलिसांची कारवाई
पहाटेच्या सुमारास जेव्हा ही भयंकर घटना उघडकीस आली, तेव्हा मृत अमृताच्या वडिलांनी अत्यंत धैर्याने स्वतः पुढे येत पोलिसांना याबद्दल माहिती देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ गाठून घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.
मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या ...
माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कसलाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनासाठी पाठवला आणि घटनास्थळावरूनच आरोपी आई आशा गरड हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ चे पोलीस अधिक तपास करत असून, या हत्येमागे आणखी काही कारणे किंवा इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही कसून शोध घेतला जात आहे.
Nashik : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी ( दि.२६) ‘मन की बात’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलसंवर्धन उपक्रमांची दखल ...
समाजात पसरलेली हळहळ
एका तरुण मुलीचा केवळ प्रेमसंबंधांच्या वादातून आईकडूनच असा अंत झाल्यामुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. आजच्या आधुनिक युगातही जातीपातीच्या भिंती किती खोलवर रुजलेल्या आहेत आणि त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंध कसे उद्ध्वस्त होत आहेत, याचे भीषण चित्र या घटनेने पुन्हा एकदा समोर आणले आहे. या प्रकरणातील कायदेशीर कारवाई आणि पुढील तपासाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.