Nashik : नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची ‘मन की बात’मध्ये दखल, प्रधानमंत्री मोदींकडून कौतुक

Nashik : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी ( दि.२६) ‘मन की बात’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलसंवर्धन उपक्रमांची दखल घेत उल्लेख केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात ‘पाऊस पकडा’ (Catch the Rain) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लोकसहभाग, विभागीय समन्वय आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्यात जलसुरक्षा बळकट करण्याचे काम सुरू आहे.



या अभियानांतर्गत जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, नाला खोलीकरण व रुंदीकरण, कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी, पर्जन्यजल संधारण, सूक्ष्म सिंचन, जलअर्थसंकल्प, जलकार्यक्षम शेती तसेच जलतारा यांसारखे विविध जलसंवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहेत. वनहक्क कायदा (एफआरए) अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या जमिनींवर मृद व जलसंधारणाची कामे करून त्या जमिनी उत्पादक व शाश्वत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच भूजल पुनर्भरण, पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि जलउपलब्धता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.



अभियानाचा उद्देश काय ?


‘पाऊस पकडा’ अभियानाचा उद्देश पावसाचा प्रत्येक थेंब स्थानिक पातळीवर साठवून जलसुरक्षा मजबूत करणे हा आहे. ग्रामपंचायती, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागामुळे जिल्ह्यात जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. या उपक्रमांची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Jal Shakti) राष्ट्रीय जल अभियानांतर्गत आयोजित ५५ व्या जल मालिकेतील वेबिनारमध्ये वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये त्यांनी ‘जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट पद्धती’ या विषयावर नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध जलसंवर्धन उपक्रमांचे सादरीकरण केले होते.



जलसंवर्धन उपक्रमाची घेतली दखल


‘मन की बात’मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘पाऊस पकडा’ (Catch the Rain) अभियानाचा उल्लेख करत पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री मोदी यांनी गाव, शहर, पंचायत आणि सामाजिक संस्थांनी जलसंवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन करून पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

Comments
Add Comment

Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या गोळ्याला संपवले; आईकडून २० वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या

Nashik Kumbhmela : गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन; मार्चपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न; शेखर सिंहांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ,

Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात