Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय


मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट संपून लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी येणार या आशेवर असलेल्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराश आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीला ऐनवेळी स्थगिती दिल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे आयोगाने हा निर्णय घेतला असून, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यतांवर आता पाणी फिरले आहे.



यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन लगेचच निवडणुकीचे बिगुल वाजणार होते. या पार्श्वभूमीवर गावागावांत इच्छुक उमेदवारांनी बैठका, कॉर्नर सभा, मतदार संपर्क आणि पॅनेल बांधणीच्या हालचाली तीव्र केल्या होत्या. मात्र, मतदार याद्या दोषमुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी सध्या राबवण्यात येत असलेली ‘एसआयआर’ मोहीम पूर्ण झाल्यानंतरच अद्ययावत विधानसभा मतदारसंघ निहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरली जावी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.



आयोगाने ४ ऑगस्टच्या प्रसिद्धीला दिलेल्या स्थगितीमुळे सुमारे ७५४ ग्रामपंचायतींसह राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. मात्र, या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरित आणि बोगस मतदारांची नावे वगळून पूर्णपणे अद्ययावत व पारदर्शक यादी हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय गणिते आणि मतांची जुळवाजुळव पूर्णपणे बदलणार आहे.



नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी, चिन्ह वाटप आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांच्या भूमिपूजनांचा धडाका सुरू असतानाच आता या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण पुन्हा ‘वेट अँड वॉच’ मोडवर गेले आहे. अतिवृष्टी आणि सणासुदीच्या काळासोबतच आता ‘एसआयआर’ मोहिमेची भर पडल्याने, नवीन अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचे नवे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

SIM Card Expiry Date : SIM कार्डवर एक्स्पायरी डेट नसते, मग ते कधी बदलावे? ५-१० वर्षांनंतर होऊ शकते समस्या!

मुंबई : मोबाईल फोनमध्ये SIM कार्ड आकाराने अगदी छोटे असले, तरी कॉलिंग, SMS आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ते अत्यंत

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)