Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय


मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट संपून लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी येणार या आशेवर असलेल्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराश आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीला ऐनवेळी स्थगिती दिल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे आयोगाने हा निर्णय घेतला असून, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यतांवर आता पाणी फिरले आहे.



यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन लगेचच निवडणुकीचे बिगुल वाजणार होते. या पार्श्वभूमीवर गावागावांत इच्छुक उमेदवारांनी बैठका, कॉर्नर सभा, मतदार संपर्क आणि पॅनेल बांधणीच्या हालचाली तीव्र केल्या होत्या. मात्र, मतदार याद्या दोषमुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी सध्या राबवण्यात येत असलेली ‘एसआयआर’ मोहीम पूर्ण झाल्यानंतरच अद्ययावत विधानसभा मतदारसंघ निहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरली जावी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.



आयोगाने ४ ऑगस्टच्या प्रसिद्धीला दिलेल्या स्थगितीमुळे सुमारे ७५४ ग्रामपंचायतींसह राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. मात्र, या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरित आणि बोगस मतदारांची नावे वगळून पूर्णपणे अद्ययावत व पारदर्शक यादी हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय गणिते आणि मतांची जुळवाजुळव पूर्णपणे बदलणार आहे.



नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी, चिन्ह वाटप आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांच्या भूमिपूजनांचा धडाका सुरू असतानाच आता या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण पुन्हा ‘वेट अँड वॉच’ मोडवर गेले आहे. अतिवृष्टी आणि सणासुदीच्या काळासोबतच आता ‘एसआयआर’ मोहिमेची भर पडल्याने, नवीन अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचे नवे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime News : डायल ११२च्या सतर्कतेने दरोडा उधळला; ११ संशयित जेरबंद

Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Trimbakeshwar Police Station) हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात

MPSC Paper Leak : एमपीएससी' पेपरफुटीच्या आरोपांप्रकरणी आयोग पोलिसांत

- पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध

Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या गोळ्याला संपवले; आईकडून २० वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या

Nashik Kumbhmela : गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन; मार्चपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न; शेखर सिंहांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ,

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर