Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत उभारणार भव्य 'सेनाभवन'

दोन जागांबाबत चाचपणी; संघटनात्मक वाढीसाठी मध्यवर्ती मुख्यालयाची गरज


मुंबई : ऑपरेशन टायगर यशस्वी करून उबाठा गटात दोनवेळा फूट पाडणाऱ्या शिवसेनेचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राजधानी मुंबईत नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी हक्काचे आणि सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय असावे, असा उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. त्यानुषंगाने वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि दादरमध्ये जागांची चाचपणी करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरमध्ये उभारलेल्या सेनाभवनाच्या धर्तीवर ही वास्तू असेल, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.



नव्या ‘सेनाभवना'साठी मुंबईत दोन जागांची प्राथमिक पाहणी झाली आहे. यातील पहिली जागा वांद्रे-कुर्ला संकुलात असून ती उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री' निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सुरुवातीला या जागेची मोठी चर्चा होती. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे मत वेगळे असल्याचे समजते. "शिवसेना (shivsena) हा मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेला पक्ष आहे. कॉर्पोरेट कार्यालयांनी व्यापलेल्या बीकेसीमधून पक्षाचे मुख्य कार्यालय चालवणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी शिवसेनेच्या परंपरेशी, इतिहासाशी आणि चळवळीशी जोडलेल्या मराठमोळ्या दादर परिसरातच हे भव्य मुख्यालय असायला हवे," अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच दादरमधील जागेला पक्ष नेतृत्वाकडून अधिक प्राधान्य आणि पसंती मिळत आहे.



जून २०२२ मधील उठावानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांत, तालुक्यांत आणि गावागावांत शिवसेनेचे जाळे वेगाने विस्तारत आहे. नवनवीन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर पक्षांतील नेत्यांचे 'इनकमिंग (incoming)' सातत्याने सुरू आहे. त्यात भर म्हणजे ऑपरेशन टायगर अंतर्गत ६ खासदार शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाचे बळ वाढले आहे. अशा स्थितीत पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी, संघटनात्मक बैठकांसाठी आणि एकूणच प्रशासकीय कामकाजासाठी एका हक्काच्या आणि भव्य मुख्यालयाची कमतरता पक्षाला जाणवत होती. मुंबई(mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आणि मुंबईवर राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज कार्यालय असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर दादरमधील एका जागेबाबत सध्या तांत्रिक अडचणी आणि काही प्रशासकीय बाबींवर पक्षांतर्गत पातळीवर खल सुरू आहे. या त्रुटी लवकरच दूर करून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



ठाकरेंच्या वर्चस्वाला आव्हान
एकीकडे खासदार, आमदार आणि तळागाळातील कार्यकर्ते पक्ष सोडत असतानाच, आता मुंबईत प्रति-शिवसेना भवन उभे राहणे हा उबाठा गटासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. दादर हे शिवसेनेचे हृदयस्थान मानले जाते, तिथेच शिंदेंच्या शिवसेनेचे पाऊल पडल्यास ठाकरेंच्या वर्चस्वाला हे आव्हान ठरणार आहे. या नव्या सेनाभवनाच्या माध्यमातून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याचा शिवसेनेचा निर्धार असला, तरी अद्याप या नियोजित प्रकल्पाबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे