Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात मोठी अपडेट! दुसरा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ३-४ दिवसांत, AIIMS कसा तयार करणार अंतिम अहवाल?

भोपाळ : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात (Twisha Sharma Death Case) दररोज नवे खुलासे आणि प्रश्न समोर येत आहेत. आता सर्वांचे लक्ष ट्विशा शर्माच्या दुसऱ्या शवविच्छेदन (Post-Mortem) अहवालाकडे (Report) लागले आहे. मात्र हा अहवाल तात्काळ उपलब्ध होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाच्या तज्ज्ञ पथकाने केलेल्या दुसऱ्या शवविच्छेदनानंतर अनेक महत्त्वाच्या वैद्यकीय आणि न्यायवैद्यक चाचण्या पार पाडल्या जाणार आहेत. यानंतरच अंतिम अहवाल तयार होणार असून त्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्विशा शर्मा प्रकरणातील दुसरा शवविच्छेदन अहवाल लगेच जाहीर होण्याची शक्यता नाही. हा अहवाल तयार करण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी (Histopathology) (ऊतकविकृतीशास्त्र), अंतर्गत अवयवांची तपासणी, नमुन्यांचे प्रयोगशाळा विश्लेषण आणि इतर न्यायवैद्यक चाचण्या (Tests) केल्या जाणार आहेत. मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी या सर्व प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणे स्वाभाविक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



AIIMS दिल्लीच्या पथकाची पुढील प्रक्रिया काय असेल?


दुसरे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक भोपाळमध्ये दाखल झाले होते. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे पथक सर्व महत्त्वाचे पुरावे सोबत घेऊन दिल्लीला परतणार आहे. यामध्ये घटनास्थळावरील पाहणी अहवाल, शवविच्छेदनादरम्यान घेतलेले फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग, जैविक नमुने आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. दिल्लीला परतल्यानंतर या सर्व पुराव्यांचे बारकाईने परीक्षण केले जाणार असून त्याच्या आधारे अंतिम अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल.



पहिल्या आणि दुसऱ्या शवविच्छेदन (Post-Mortem Report) अहवालांची होणार तुलना


AIIMS च्या तज्ज्ञांकडून तयार करण्यात येणारा दुसरा अहवाल हा यापूर्वीच्या शवविच्छेदन अहवालाशी तुलना करून तपासला जाणार आहे. पहिल्या अहवालातील निष्कर्ष आणि दुसऱ्या शवविच्छेदनातील (Post-Mortem) निरीक्षणे यांचा परस्पर संबंध तपासला जाईल. याशिवाय शवविच्छेदनादरम्यान करण्यात आलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचे आणि छायाचित्रांचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. अहवालामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि तो न्यायालयीन प्रक्रियेसाठीही सक्षम ठरावा यासाठी कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


अंतिम अहवाल ३ ते ४ दिवसांत येण्याची शक्यता


सर्व प्रयोगशाळा चाचण्या, नमुन्यांचे विश्लेषण आणि उपलब्ध कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल तयार करण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. हा अहवाल तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मृत्यूचे नेमके कारण, त्यामागील परिस्थिती आणि इतर महत्त्वाचे पैलू स्पष्ट करण्यासाठी हा अहवाल निर्णायक ठरू शकतो.



ट्विशा शर्मा प्रकरणात आतापर्यंत काय घडले?


मिळालेल्या माहितीनुसार, ११ ते १२ मेच्या मध्यरात्री भोपाळमधील कटारा हिल्स परिसरातील राहत्या घरी ट्विशा शर्माचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर १२ मे रोजी तिचे पहिले शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, पहिल्या शवविच्छेदन अहवालाबाबत कुटुंबीयांनी अनेक शंका उपस्थित केल्या. यानंतर प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. विविध सामाजिक संघटना आणि कुटुंबीयांकडून आंदोलन करण्यात आले तसेच दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी जोर धरू लागली. अखेर २४ मे रोजी दिल्लीतील एम्सच्या तज्ज्ञ पथकाने भोपाळमध्ये येऊन दुसरे शवविच्छेदन केले. त्याच दिवशी ट्विशा शर्मावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.



ट्विशाच्या वैवाहिक आयुष्याचीही चौकशी सुरू


तपास यंत्रणांनी ट्विशा शर्माच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्याचाही तपास सुरू केला आहे. ट्विशाने डिसेंबर २०२५ मध्ये समर्थ सिंग याच्याशी विवाह केला होता. दोघांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटद्वारे झाली होती. दरम्यान, लग्नानंतरचे काही चॅट्स आणि संवाद तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या संवादांमधून दोघांमध्ये काही मतभेद असल्याचे संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणा या सर्व बाबींची सखोल चौकशी करत असून अंतिम शवविच्छेदन अहवालासोबतच इतर पुराव्यांचाही बारकाईने अभ्यास केला जात आहे. ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील अंतिम अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष आता AIIMS दिल्लीच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

Comments
Add Comment

Raigad Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात; ७०० फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून ८ तरुणांचा मृत्यू

रायगड : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात

Aishwarya Rai Bachchan Cannes-2026 Look : ऐश्वर्या रायच्या समर्थनार्थ कंगना मैदानात; म्हणाली, "ती कुणाला खूश करण्यासाठी जगत नाही"

मुंबई : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ (Cannes Film Festival 2026) मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai Bachchan) उपस्थितीची

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं! सलग चौथ्यांदा झाली दरवाढ

नवी दिल्ली : देशभरातील वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ११

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या