Raigad Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात; ७०० फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून ८ तरुणांचा मृत्यू

रायगड : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात रविवारी पहाटे भीषण अपघात (Accident) घडला. प्रवाशांनी भरलेली एक स्कॉर्पिओ जिप (Scorpio Jeep) अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत वाहनातील सर्व ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, मृत सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.


विशेष म्हणजे, २०१८ मध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला ज्या ठिकाणी भीषण अपघात झाला होता, त्याच परिसरात हा अपघात घडल्याने पुन्हा एकदा आंबेनळी घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली दुर्घटना


मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी पहाटे सुमारे २:४५ वाजता घडला. आसगाव येथील आठ तरुण स्कॉर्पिओ जिपमधून प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार, खोल दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे अपघात अधिक भीषण होता. वाहन दरीत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. मात्र दरी अत्यंत खोल असल्याने वाहनापर्यंत पोहोचणे आणि परिस्थितीचा अंदाज घेणे सुरुवातीला कठीण झाले.



बचावकार्यात (Rescue Operation) अनेक पथकांचा सहभाग


अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विविध बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दरीची खोली ५०० ते ७०० फूट असल्याने बचाव आणि शोधमोहीम राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड-पोलादपूर, आपदा मित्र तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि मदत पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. बचाव पथकाने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली असून, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



या दुर्घटनेची माहिती समोर येताच आसगाव गावासह संपूर्ण कोरेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. एका गावातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंबेनळी घाटातील धोकादायक वळणे, खोल दऱ्या आणि वारंवार घडणारे अपघात लक्षात घेता या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Comments

सुभाष म्हात्रे    May 25, 2026 12:17 PM

कोठल्याही घाटात वळणे अधिक असल्याने रात्रीच्या वेळेस प्रवास कोणीही करू नय असे वाटते.

Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या