Raigad Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात; ७०० फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून ८ तरुणांचा मृत्यू

रायगड : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात रविवारी पहाटे भीषण अपघात (Accident) घडला. प्रवाशांनी भरलेली एक स्कॉर्पिओ जिप (Scorpio Jeep) अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत वाहनातील सर्व ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, मृत सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.


विशेष म्हणजे, २०१८ मध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला ज्या ठिकाणी भीषण अपघात झाला होता, त्याच परिसरात हा अपघात घडल्याने पुन्हा एकदा आंबेनळी घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली दुर्घटना


मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी पहाटे सुमारे २:४५ वाजता घडला. आसगाव येथील आठ तरुण स्कॉर्पिओ जिपमधून प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार, खोल दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे अपघात अधिक भीषण होता. वाहन दरीत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. मात्र दरी अत्यंत खोल असल्याने वाहनापर्यंत पोहोचणे आणि परिस्थितीचा अंदाज घेणे सुरुवातीला कठीण झाले.



बचावकार्यात (Rescue Operation) अनेक पथकांचा सहभाग


अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विविध बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दरीची खोली ५०० ते ७०० फूट असल्याने बचाव आणि शोधमोहीम राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड-पोलादपूर, आपदा मित्र तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि मदत पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. बचाव पथकाने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली असून, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



या दुर्घटनेची माहिती समोर येताच आसगाव गावासह संपूर्ण कोरेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. एका गावातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंबेनळी घाटातील धोकादायक वळणे, खोल दऱ्या आणि वारंवार घडणारे अपघात लक्षात घेता या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Comments

सुभाष म्हात्रे    May 25, 2026 12:17 PM

कोठल्याही घाटात वळणे अधिक असल्याने रात्रीच्या वेळेस प्रवास कोणीही करू नय असे वाटते.

Add Comment

Devendra Fadnavis : देशी गायीकडे ज्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांचे नुकसान झाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर (Nagpur) : भारत देश हा कृषी संस्कृतीचा होता. देश संपन्न होता. दूध,दही भरपूर प्रमाणात होते. हे समृद्धीचे प्रतीक

Mayor Ritu Tawde : कुर्ल्यातील वृक्ष दुर्घटनेनंतर महापौर ॲक्शन मोडमध्ये! मृताच्या कुटुंबाला ₹५ लाखांची मदत; मुंबईत तातडीच्या ट्री ऑडिटचे आदेश

मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात झाडाची फांदी कोसळून ६३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी

एकाच कुटुंबातील पाच जण गायब ! पळाले की घातपात ? नेमकं घडलं काय ?

Nagpur : नागपूरच्या धानतोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्य २४ जूनपासून

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank : औरंगाबाद जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा; २० पैकी १८ जागांवर वर्चस्व, भूमिपुत्र बचाव पॅनलचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central

Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ

Pune Airport News : पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली! धावपट्टीवर विमानाचे इमर्जन्सी ब्रेक

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) शुक्रवारी (३ जुलै) मोठी दुर्घटना (Major Accident) थोडक्यात टळली. पुणे-जयपूर