मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज बच्चू कडू (Bachchu Kadu) विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निर्णयामुळे विशेषतः विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.
नागपूरमधील महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा ...
मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रहार’चा राजकीय पक्ष भाग शिवसेनेत विलीन होणार असून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रहार’ संघटना मात्र स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील ...
या घडामोडीनंतर पुढील काही महिन्यांत बच्चू कडू यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी सुरू असून, त्याचाच भाग म्हणून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.






