Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीOver Hydration: प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणेही आहे धोकादायक, व्हा सावध

Over Hydration: प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणेही आहे धोकादायक, व्हा सावध

मुंबई: शरीर गरम झाल्याने अथवा डिहायड्रेशन झाल्यास भरपूर पाणी प्यावेसे वाटत असेल तर एकत्र खूप पाणी पिऊ नका. ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. यामुळे वॉटर टॉक्सिसिटी होणार नाही.

उन्हाळ्याच्या दिवसांत घाम येत असल्याने तहानही खूप लागते. लोक डिहायड्रेशनपासून बचावासाठी सतत पाणी पित असतात. आरोग्य तज्ञही यावेळेत पाणी खूप पिण्याचा सल्ला देतात.मात्र अनेकदा तहान भागवण्यासाठी भरपूर पाणी पिणेही तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते.

भरपूर पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्राणही जाऊ शकतात. याला वॉटर टॉक्सिसिटी म्हणतात. यामुळे कधीही एकत्रित भरपूर पाणी पिऊ नये.

उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि सतत तहान लागते. ही तहान भागवण्यासाठी अनेकजण एक दोन ग्लास पाणी पिण्याऐवजी खूप पाणी एकदम पितात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट बॅलन्स बिघडू लागतो आणि सोडियमचे प्रमाण अचानक कमी होते.

रक्तात सोडियमची कमतरता जाणवल्याने शरीरात सूज निर्माण होऊ शकते. याचा योग्य वेळी उपचार झाला नाही तर मृत्यूही ओढवू शकतो.

त्यामुळे भरपूर तहान जरी लागली असली तरी एकाच वेळेस भरपूर पाणी पिऊ नका. याशिवाय नारळपाणी, लिंबू पाणी, फ्रेश फ्रूट ज्यूस प्यायल्याने तहान भागते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -