Thursday, August 27, 2026

Minister Girish Mahajan : महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले, चौघांशी संपर्क - मंत्री गिरीश महाजन

Minister Girish Mahajan : महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले, चौघांशी संपर्क - मंत्री गिरीश महाजन

Minister Girish Mahajan : नेपाळमध्ये आलेल्या महापुरात (Flood Flash) अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या (Tourist) शोधासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज दिली. (Nashik News)

पर्यटकांच्या शोधासाठी नेपाळ सरकारच्या संपर्कात

पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, नेपाळ तिबेटमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली असून तिथे महापूर आला असून भूस्खलन झालं या विदारक परिस्थितीमध्ये अनेक लोक वाहून गेले. मानस सरोवरला अनेक पर्यटक जातात, रिचा ट्रॅव्हलच्या माध्यमातून 2 बस तिकडे गेल्या होत्या माझ्या बाजूचे लोकं सुद्धा गेले होते पहिल्या दिवशी संपर्क झाला नव्हता आता झाला आहे मात्र अजूनही अनेकांशी संपर्क अजूनही होत नाही. फोनवर संपर्क करतोय पण अडचणी येत आहे. सोबतच कोण कोण फिरायला गेले याची माहिती गोळा करतोय. वेबसाईटवर अनेक जण माहिती देतात, दिल्लीशी आपण सतत संपर्कात आहोत. (Nashik News)

राज्यातील पर्यटक दोन बसमधून तेथे गेले आहेत. या बस रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या आहेत. ४५ जणांचे दोन गट आहेत. यातील चार जणांशी संपर्क झाला असून, इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. भूस्खलनामुळे तेथील नेटवर्क यंत्रणा कोलमडली आहे. प्रशासनाचा चार जणांशी संपर्क झाला असून, त्यांच्या माध्यमातून अनेक पर्यटक सुरक्षित असल्याचे कळाले आहे. नागरिक किंवा नातेवाईकांकडे या भागात गेलेल्या पर्यटकांची माहिती असल्यास त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा शासकीय पोर्टलवर द्यावी. २४ तास नियंत्रण कक्ष आणि संकेतस्थळ सुरू असून, राज्य सरकार केंद्र सरकार आणि नेपाळ प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. (Nashik News)

कुंभ सर्वांचा आहे रुसवेफुगवे नको

यावेळी मंत्री महाजन कुंभमेळ्याविषयी देखील भाष्य केले. नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चांवर मंत्री महाजन म्हणाले की, थोडं प्रेझेंटेशन द्यायचे होते, म्हणून बैठक बोलावली होती. दुसऱ्या बैठका लांबल्यामुळे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) उशिरा गेले. काही लोक भेटले, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. झाली ती चूक झाली कुंभ सर्वांचा आहे रुसवेफुगवे नको असे ते म्हणाले. तर उद्या नाशिकमध्ये मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे यावर देखील त्यांनी भाष्य केले. mvp, कुंभ, कृषी आणि विद्यापीठ कार्यक्रम होणार आहे हे सर्व भरगच्च कार्यक्रम असणार आहे कुंभाची कामे व्यवस्थित सुरु आहे काम चांगले होतील. असे ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >