Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमळनेर (Amalner) तालुक्यातील खवशी (Khavshi) येथील गाव तलावाच्या पाण्यात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली विरेंद्र उर्फ विरु अण्णा तलवारे (७) आणि त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खवशी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Jalgaon News)
Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठी योजना आखण्यात आली आहे. ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विरु तलवारे हा गुरुवारी सकाळी तलाव परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो तलावाच्या पाण्यात उतरला. मात्र ही गोष्ट काही वेळाने वडिलांच्या निदर्शनास आले. मुलाच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी देखील तत्काळ तलावात धाव घेतली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अण्णा हे तलावातील गाळात अडकले. तलावात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना बाहेर निघणे झाले. अन काही वेळातच दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. नागरिकांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र बाप-लेकाला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेनंतर तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (Jalgaon News)
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलींचा ...
मयत अण्णा तलवारे आणि त्यांचा मुलगा विरु हे मूळचे आर्वी (ता. जि. धुळे) येथील मूळ रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या अण्णा यांची सासुरवाडी असलेल्या खवशी येथे वास्तव्यास होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते येथे राहत होते. मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





