Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की

कोलंबो : भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील रोमहर्षक झुंज केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावर झालेल्या वादावादीमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरनंतर श्रीलंकेने बाजी मारली, मात्र विजयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याने मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



निर्धारित ५० षटकांच्या खेळात दोन्ही संघांनी प्रत्येकी २६५ धावा केल्याने सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे मैदानात उतरले. अखेरच्या तीन चेंडूंवर १४ धावांची गरज असताना वैभवला केवळ ७ धावाच करता आल्या आणि भारताने हा सामना गमावला. पराभवाच्या पदरी पडलेल्या निराशेतून आणि मैदानावरील तणावातून वादाची ठिणगी पडली.



सामना संपल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू विजयाचा जल्लोष करत असतानाच, भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या एका क्षेत्ररक्षकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता-बघता धक्काबुक्कीत झाले. वैभवचा संताप इतका अनावर झाला होता की, त्याने श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का दिला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून तिकडूनही तसेच कृत्य झाले. अखेर सूर्यांश शेडगे आणि श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांनाही एकमेकांपासून दूर केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.



मैदानावर निर्माण झालेल्या या तणावामागे खराब प्रकाशयोजनेचे कारण असल्याचे बोलले जात आहे. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाश कमी असल्याने अंपायर सुपर ओव्हर घेण्यास तयार नव्हते, ज्यावरून भारताचा कर्णधार तिलक वर्मा आणि अंपायर यांच्यात बराच काळ वादावादी झाली होती. याच पार्श्वभूमीवर खेळाडू आधीच तणावाखाली होते आणि पराभवाच्या झटक्यानंतर या रागाचा स्फोट मैदानावर झाला.



तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ४९.२ षटकांत २६५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात अरशद खानच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेलाही ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २६५ धावांपर्यंतच मजल मारता आली. जरी मैदानावर काही काळ कटुता निर्माण झाली असली, तरी सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. अफगाणिस्तान 'ए' विरुद्धच्या पराभवानंतर इंडिया 'ए' चा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील