भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार असून, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. ही मालिका ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ चा भाग असल्याने दोन्ही संघांसाठी विजयाचे महत्त्व अधिक आहे. गॉलची खेळपट्टी साधारणपणे सामन्याच्या पुढील टप्प्यात फिरकी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्या आणि रमेश मेंडिस यांच्या फिरकीचे मोठे आव्हान असेल. घरच्या मैदानावर या दोन्ही गोलंदाजांचा अनुभव आणि कामगिरी श्रीलंकेसाठी महत्त्वाचे अस्त्र मानले जात आहे.
मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत म्हणजेच Wordmark मध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने ...
विशेष म्हणजे, भारतीय संघ मागील काही काळात फिरकीविरुद्ध अपेक्षेप्रमाणे सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात संघर्ष करताना दिसला आहे. त्यामुळे गॉलमध्ये फिरकीला योग्य पद्धतीने सामोरे जाणे हा टीम इंडियाच्या फलंदाजीसमोरील प्रमुख प्रश्न असेल. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच संयम राखून खेळण्याची गरज आहे. या परिस्थितीचा विचार करता, भारतीय संघाच्या प्लेइंग-११ मध्ये तीन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळण्याची शक्यता चर्चेत आहे. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मानव सुथार या तिघांना एकत्र संधी देण्याचा पर्याय टीम मॅनेजमेंटसमोर आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनीही या तिघांच्या वेगवेगळ्या शैलींचा संघाला फायदा होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.
दरम्यान, भारताला या मालिकेपूर्वी काही धक्केही बसले आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मालिकेतून बाहेर आहे, तर साई सुदर्शन दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश करण्यात आला आहे.श्रीलंकेने पहिल्या कसोटीसाठी धनंजया डी सिल्वाच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला संघात परतला आहे, तर दुखापतीमुळे कुसल मेंडिस मालिकेतून बाहेर आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ...
गॉलमध्ये फिरकी, हवामान आणि क्रॉसविंड्स सामन्याच्या रणनीतीवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून परिस्थितीचा अंदाज घेत योग्य संयोजन निवडणे दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या कसोटीत टीम इंडिया श्रीलंकेच्या फिरकीचा सामना कसा करते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.