नवी दिल्ली : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. पण सकाळी काँग्रेस मुख्यालयात एक अनेपेक्षित अशी घटना घडली. राष्ट्रध्वज ...
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ३७ चेंडूत पाच चौकार मारत ३२ धावा करू शकला. तो धावचीत झाला तर एक षटकार आणि नऊ चौकार मारत ७७ धावा करणारा केएल राहुल जखमी झाल्यामुळे मैदानाबाहेर (रिटायर्ड हर्ट) गेला आहे. कर्णधार शुभमन गिलने दोन चौकार मारत १६ धावा केल्या. तो प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर लाहिरू उदाराकडे झेल देऊन परतला.
मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम येथील एका इमारतीला आग लागल्याची ही ...
श्रीलंकेने फक्त तीन नोबॉल आणि दोन लेगबाय असे पाच अवांतर चेंडू वगळता पहिल्या दिवशी चांगली गोलंदाजी केली. शिवाय पावसाचाही भारताला फटका बसला. यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवशी ७३ षटकांत दोन बाद २८८ धावा केल्या. भारताची धावगती ३.९५ एवढीच आहे. आता दुसऱ्या दिवशी धावा काढण्याचा वेग वाढवून भारतीय संघ श्रीलंकेवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे तर श्रीलंका भारताची कोंडी करून लवकर विकेट मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.
मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरवणारा 'बौद्धिक' नक्षलवाद हा त्याहून ...
जयस्वालला भोवली धडक
वेगाने धाव घेताना गोलंदाजाला धडकणे जयस्वालला भोवले. तो लयीत येत असताना धावचीत झाला. तर चहापानानंतर पायात पेटके येऊ लागल्यामुळे केएल राहुलला मैदान सोडावे लागले. या दोन घटना आणि गिलने फटकेबाजीच्या प्रयत्नात गमावलेली विकेट यामुळे भारतीय संघाला पहिल्या दिवशी ३०० चा टप्पा पार करणे जमले नाही. अर्थात भारतीय संघ सध्या सुस्थितीत दिसत आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी पडिक्कल आणि पंत काय करतात याकडे अनेकांचे लक्ष असेल. केएल राहुलच्या तब्येतीत सुधारणा झाली तर तो पुन्हा खेळण्याचीही शक्यता आहे. यामुळे श्रीलंकेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.