पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथ ओढण्याचा तसेच चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या बैलजोड्यांनाच देण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.दरम्यान, देहूगाव ते चिंचोळी येथील पादुका मंदिरापर्यंत पालखी रथास स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोडीला जुंपण्याचा मान द्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी मधुकर काळोखे यांनी संस्थानकडे अर्जाद्वारे केली आहे. या मागणीमुळे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगली होती.
रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली आहे. ...
मात्र, संस्थानने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत पालखी रथासाठी संस्थानने स्वतः खरेदी केलेल्या बैलजोड्याच वापरण्यात येतील, असे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान संस्थानच्या बैलजोड्यांनाच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या सोहळ्यातील प्रत्येक मान आणि परंपरेला विशेष महत्त्व असल्याने अशा विषयांबाबत वारकरी आणि भाविकांमध्ये उत्सुकता असते.






