मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आज मंगळवारी १० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वीस (९:२०) च्या सुमारास मला धमकी देणारा एक ईमेल आला. या संदर्भात महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने मला तत्काळ सूचना दिल्या असे महापौर रितू तावडे यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. व्यक्तिशः मी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा आणि मला डगमगवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही; असेही त्या म्हणाल्या.
MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस अपघाताची घटना ताजी असतानाच, आता कांदिवली ...
धमकीचा मेल आल्याची माहिती मला पोलिसांनी दिली. मात्र, जनतेची कामे आणि आधीच नियोजित असलेल्या महत्त्वाच्या बैठका खोळंबून राहू नयेत, यासाठी मी पूर्वलक्षित कार्यक्रमानुसार महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहून बैठकांना हजेरी लावली. माझ्यासाठी कर्तव्याला नेहमीच पहिले प्राधान्य आहे आणि राहील, असे महापौर म्हणाल्या.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) चांदिवली (Chandiwali) येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात आगीसारख्या घटना घडल्यास आग ...
धमकीसारख्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित आहे आणि ते करतही आहेत; असे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
- मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा - तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये ...
माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने माझे वाहन, कार्यालयीन दालन आणि वैयक्तिक सुरक्षा बाबतची योग्य ती कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही प्रशासन त्यांच्या पातळीवर चोखपणे करेल, याचा मला विश्वास आहे, असे महापौर म्हणाल्या.
मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे रस्त्यांवर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या ...
व्यक्तिशः मी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा आणि मला डगमगवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी माझे काम नियमितपणे सुरू राहील. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही शहरांच्या महापौरांना अशाच प्रकारच्या धमक्या आल्याचे मला समजले आहे. हे एक कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही; अशी शंका महापौर रितू तावडे यांनी उपस्थित केली.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर आंतरबदल आणि गोरेगाव-मुलूंड लिंक रोड यांना ...
राज्याच्या गृह खात्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ते या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कडक कारवाई निश्चित करतील. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आपले काम करत आहे आणि मी माझे जनसेवेचे व्रत सुरूच ठेवेन. अशा धमक्यांमुळे मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षेचा वेग मंदावणार नाही; असेही महापौरांनी सांगितले.




