Cyber Crime : चोरांनी शोधला नवा फंडा , सेल्फी काढत असाल तर व्हा सावधान !

मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोनवर सेल्फी काढणे आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करणे ही एक फॅशन झाली आहे. फोटो काढताना अनेकदा नकळतपणे हाताची दोन बोटे दाखवून 'व्हिक्टरी' किंवा 'व्ही' (V) साइन देण्याची सवय अनेक लोकांना असते. मात्र, तुमची हीच सवय तुम्हाला आर्थिक संकटात फसवू शकते. सायबर गुन्हेगारांनी आता लोकांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) चा वापर करून फिंगरप्रिंट(Fingerprint) चोरी करण्याची नवीन पद्धत शोधली आहे. त्यातून ते लोकांची बँक अकाऊंट रिकामी करत आहेत.



सेल्फी काढताना तुम्हीही दोन बोटं दाखवता तर मग समजा तुमचं बँक अकाऊंट रिकामं झालंच. कारण फिंगरप्रिंट चोरीचा नवी AI पद्धत तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करु शकते. जर फोटोमधील बोटांची टोकं कॅमेऱ्याकडे असतील, फोटो दीड मीटर अंतरावरून काढला असेल, तर बोटांचे ठसे स्पष्टपणे काढता येतात. दीड ते तीन मीटर अंतरावरून काढलेल्या फोटोंमधूनही अर्धा फिंगरप्रिंट डेटा मिळवता येतो. आपण जर बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो बदलता येतो. मात्र आपले फिंगरप्रिंट आयुष्यभर बदलता येत नाहीत. त्यामुळे हा बायोमेट्रिक डेटा चोरीला गेल्यास बँक खाती, डिजिटल पेमेंट सिस्टम आणि वैयक्तिक ओळखीला धोका निर्माण होऊ शकतो.



सायबर तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोटे दाखवून फोटो काढत असाल आणि तो फोटो हाय-क्वालिटी असेल, तर तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स धोक्यात येतात. जर फोटो सुमारे १.५ मीटर अंतरावरून काढला असेल, तर चोरांना बोटांचे ठसे अगदी स्पष्टपणे मिळवता येतात. अगदी १.५ ते ३ मीटर अंतरावरून काढलेल्या फोटोंमधूनही सायबर चोरटे सुमारे ५०% फिंगरप्रिंट डेटा सहज गोळा करू शकतात. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने या फिंगरप्रिंट्सची हुबेहूब नक्कल तयार केली जाते.



आपण बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो रिसेट करता येतो. मात्र, आपले फिंगरप्रिंट्स बदलता येत नाहीत. हा बायोमेट्रिक डेटा एकदा चोरीला गेल्यास तुमची बँक खाती, डिजिटल पेमेंट सिस्टम (UPI) आणि वैयक्तिक ओळखीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो शेअर करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला