मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ अधिक भव्य, आकर्षक आणि जागतिक दर्जाचा आयोजित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या महोत्सवाच्या नियोजनाला वेग देण्यात आला असून, नैसर्गिक सौंदर्य, साहसी पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीचा संगम घडविणारा हा महोत्सव राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. (Koyna Dam)
मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय ...
मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थानी गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे माजी संचालक मंगेश जोशी, नवनियुक्त संचालक विकास पानसरे, उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.मागील वर्षीच्या महोत्सवाच्या अनुभवाचा आढावा घेऊन यंदाचा फेस्टिव्हल अधिक संस्मरणीय करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तंबू निवास (टेंट सिटी), जलक्रीडा, हाऊसबोटिंग, लेझर शो, ड्रोन शो, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सव अधिक प्रभावीपणे आयोजित करण्याबरोबरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रभावी ब्रँडिंगसाठी विविध ठिकाणी डिजिटल स्क्रीन उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (Shambhuraj Desai)
मुंबई : मार्व्हल स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' हा चित्रपट उद्या (३० जुलै) जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ...
पर्यंटकांना सुविधा उपलब्ध करुन द्या
यंदाच्या महोत्सवात पर्यटकांसाठी अनेक नवे आकर्षणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्निव्हल फेस्टिव्हल, फ्लोटिंग मार्केट, हेलिकॉप्टर राईड, घोडेस्वारी, पतंग महोत्सव, ऐतिहासिक वारसा स्थळांची (हेरिटेज) पर्यटन सफर आणि योगा उपक्रमांचा समावेश असेल. या माध्यमातून कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हलला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले. ख्रिसमस ते नववर्ष या कालावधीत हा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि प्रभावी नियोजनासह आयोजित करण्यात येणार असून, देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.