Navnath Ban : बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या वाझेचे समर्थन केल्याबद्दल उद्धवजींना प्रश्न विचारलात का?

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांना सवाल ‘गुन्हेगारांनो भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे’,


ही टॅगलाईन उद्धव ठाकरे यांची होती हे जनाब संजय राऊत विसरले असतील. पुण्यातील विषारी दारूप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपींवर कारवाई केली आणि दोषी पोलिसांनाही निलंबित करण्याची हिंमत देवाभाऊंनी दाखवली. मुख्यमंत्री असताना वाझे काय लादेन आहे का, म्हणत बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्याचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना एका वाक्याने प्रश्न विचारण्याची हिंमत तुम्ही केली का? असा खडा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. दारूचे नेटवर्क उध्वस्त करण्याचे काम पोलीस करत आहेत. गांजा ओढून, नशाबाजी करून पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊत यांनी ते सकाळी सकाळी कुठली हातभट्टी पिऊन बडबड करतात याचे उत्तर एकदा महाराष्ट्राला दिले पाहिजे.



एका गटाचे जबाबदार खासदार असलेल्या संजय राऊतांनी पुरावे न देता केवळ माध्यमांसमोर येऊन वायफळ बडबड करण्यापेक्षा कुठल्या आमदाराचे अवैध दारू धंदे आहेत हे सांगण्याची हिंमत करावी. सकाळच्या पत्रकार परिषदेत या अवैध दारूवाल्या आमदारांचे धंदे उघड करावेत, असे आव्हान देत अवैध दारूवाले शोधले तर सर्वाधिक अवैध दारूवाले हे महाविकास आघाडीचे आणि संजय राऊत यांचे समर्थक सापडतील, असा आरोप बन यांनी केला. विधान परिषदेच्या 17 जागांवर महाविकास आघाडीचे 17 उमेदवार उभे केले तरी काहीही फरक पडणार नाही, असे सांगून श्री. बन म्हणाले की सर्व 17 जागी महायुतीचाच विजय होईल यात अजिबात शंका नाही. ही निवडणूक 17 विरुद्ध शून्य अशा फरकाने महायुती जिंकणार आहे. तुम्ही नांदेड, हिंगोली, परभणीवर दावा करा नाहीतर न्यूयॉर्कवर दावा करा. काहीही फरक पडत नाही. रावळपिंडी, लाहोरमध्ये एखादी विधानपरिषदेची निवडणूक असेल तर ती तुम्ही लढायला पाहिजे. कारण भारतातील, महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. तुमचा जयजयकार लाहोर, रावळपिंडी, कराचीत नक्की होईल. त्यामुळे आपल्या पक्षातील लोकांना तिथली विधान परिषद कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा. कदाचित तिथे तुम्हाला विजय मिळेल. मराठा समाजासाठी लढा देणे महत्त्वाचे आहे. सरकारनेही मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने केले. या आधीच्या एकाही सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल आदर नव्हता. एकही मागणी मान्य करण्याची हिंमत आधीच्या सरकारने दाखवली नाही, ती देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात 10 टक्के आरक्षण मिळत आहे. मराठवाड्यात 40 डिग्रीच्यावर तापमान असताना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये. त्यामुळे आपल्याला आणि समाजबांधवांनाही त्रास होणार आहे. कृपया सरकारला सहकार्य करा. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अजूनही तुमच्या काही मागण्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी सरकार चर्चेला तयार आहे. चर्चेतून तोडगा निघतो. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी विनंतीही नवनाथ बन यांनी केली.
Comments
Add Comment

Nashik : 'मृताचा पुनर्जन्म' करून म्हाडाचं घर हडपलं! २८ वर्षांपूर्वी मृत व्यक्तीला जिवंत दाखवत लाखोंच्या गाळ्यावर डल्ला

Nashik : नाशिकमध्ये एका मृत व्यक्तीने घर घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऐकून तुम्हालांही आश्यर्य वाटलं ना ?

Golden Era : भारताचा अमेरिकन ट्रेझरी साठा ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर; आरबीआयने सोन्यावर लावला मोठा डाव!

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आपल्या परकीय चलन व्यवस्थापनात मोठा बदल करत असल्याचे समोर आले आहे. आरबीआयने अमेरिकन

Nashik News: नाशिकच्या आश्रम शाळेत संतापजनक घटना !अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalwan) तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कळवण

Nashik TCS Case : तुरुंगात जन्म होण्याचा कलंक लागू नये... असा तर्क देत निदा खानला जामीन देताना न्यायालय काय म्हणाले ?

Nashik TCS Case :   नाशिक टीसीएस कंपनीमधील महिला अत्याचार आणि कथित धार्मिक बळजबरी प्रकरणातील महिला आरोपी निदा खान हिला

'Deool Band 2' Marathi Movie : 'देऊळ बंद २'ला शाहरुख खानची साथ; ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) चर्चेत असलेल्या ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2) या चित्रपटाला बॉलिवूडचा (Bollywood) ‘किंग

Nashik : येवल्यात भरधाव कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; ७७ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

Nashik : येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात आसरा हॉटेलजवळ गुरुवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात पिंपळगाव जलाल येथील