Tuesday, May 26, 2026

Malad-Goregaon Encroachments : वांद्रेनंतर आता मालाड-गोरेगावमध्ये धडक कारवाई! पश्चिम रेल्वेचा बुलडोझर अतिक्रमणांवर चालला

Malad-Goregaon Encroachments : वांद्रेनंतर आता मालाड-गोरेगावमध्ये धडक कारवाई! पश्चिम रेल्वेचा बुलडोझर अतिक्रमणांवर चालला

मुंबई : मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली असून, वांद्रे पूर्वेतील कारवाईनंतर आता Goregaon आणि Malad परिसरातील झोपड्या आणि बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. (Malad-Goregaon Encroachments)

पश्चिम रेल्वेकडून गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान पूर्वेकडील रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे १५०० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली होती. या ठिकाणी ३६ पक्की आणि २४ तात्पुरती बांधकामे उभारण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत २६ पक्की बांधकामे हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. (Malad-Goregaon Encroachments)

रेल्वे विस्तारासाठी जागा मोकळी : 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जागा भविष्यात हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईतील वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वेवरील ताण लक्षात घेता रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार अत्यावश्यक बनला आहे. यामुळे रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवास अधिक सुरक्षित करणे आणि रेल्वे रुळांवरील अतिक्रमणामुळे होणारे अपघात रोखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. (Malad-Goregaon Encroachments)

परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त : 

अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे अधिकारी, महापालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई पार पडत आहे. काही ठिकाणी रहिवाशांकडून विरोधाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. (Malad-Goregaon Encroachments)

वांद्रे पूर्वेनंतर पुन्हा मोठी मोहीम : 

काही दिवसांपूर्वीच Bandra East येथील गरीबनगर परिसरातही पश्चिम रेल्वेकडून मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली होती. त्या कारवाईनंतर आता मालाड-गोरेगाव भागातील मोहीम अधिक चर्चेत आली आहे. आगामी रेल्वे प्रकल्प, ट्रॅक विस्तार आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. (Malad-Goregaon Encroachments)

दरम्यान, या कारवाईमुळे अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून स्थानिकांकडून पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment