मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला. रेल्वे रुळालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत वस्त्या हटवण्यासाठी प्रशासन आणि पालिकेचं पथक घटनास्थळी पोहोचताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. कारवाई रोखण्यासाठी संतप्त जमावाने प्रशासन आणि पोलिसांच्या दिशेनं बादल्या, पाण्याच्या बाटल्या तसेच घरातील विविध वस्तू फेकून जोरदार विरोध दर्शवला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभारण्यात आली होती. काही ठिकाणी चार मजली इमारती तर काही भागात मोबाईल टॉवरदेखील उभारण्यात आल्याचं प्रशासनाच्या पाहणीत समोर आलं आहे. यापूर्वी पालिकेनं संबंधितांना नोटिसा बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण हटवण्यात आलं नसल्याने प्रशासनाने अखेर मोठी तोडक कारवाई सुरू केली. या मोहिमेत काही अनधिकृत धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानकाबाहेर उभारण्यात आलेल्या ...
पालिकेच्या नियोजनानुसार दोन दिवसांत झोपडपट्टी परिसरातील सुमारे ५०० घरांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १०० घरांना तात्पुरतं संरक्षण देण्यात आल्यानं त्या घरांवर सध्या कारवाई होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रात वाढत्या प्रवासी संख्येमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. सध्या मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर वाढत्या गर्दीचा ताण जाणवत असून अतिरिक्त टर्मिनल स्टेशन आणि नव्या प्लॅटफॉर्मची गरज निर्माण झाली आहे.
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर पुणे ...





