पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असताना नव्हे, तर घरी झोपलेले असताना बेडवरून खाली पडल्याने त्यांचा दुःखद अंत झाला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, उत्तरीय तपासणी अहवालातून मृत्यूचे कारण समोर आले आहे.


संभाजी शिवाजी दोलतोडे (वय ३२, रा. अरविंद धाम, पोलीस वसाहत सोलापूर) असे या मृत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. रोजच्याप्रमाणे ते रात्री आपल्या निवासस्थानी झोपले होते. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ते झोपेतच अचानक बेडवरून खाली पडले.


अचानक झालेल्या या अपघातामुळे दोलतोडे यांच्या डोक्यामागील बाजूस गंभीर मार लागला. मार लागल्यानंतर त्यांना तात्काळ उलटीही झाली. पत्नीने लागलीच त्यांना उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना तातडीने अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.


मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणीनंतर संभाजी दोलतोडे यांना मृत घोषित केले. या आकस्मिक घटनेमुळे दोलतोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस नाईक चव्हाण यांनी दिली.


सोलापूर शहर वाहतूक शाखेतील मृत पोलीस अंमलदार संभाजी दोलतोडे हे मूळगाव उपळाई खुर्द येथील होते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी संभाजी यांच्यावरच होती. संभाजी यांना एक आठ वर्षाची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. संभाजी दोलतोडे पार्थिवावर अंत्यविधी मूळ गावी करण्यात आला. संभाजी यांच्या अंत्यविधीला मोठी गर्दी होती.

अवघ्या बत्तीस वर्षांच्या तरुण अंमलदाराच्या अशा अचानक जाण्याने सोलापूर शहर पोलीस दलातील त्यांचे मित्र आणि सहकारी यांनाही मोठा धक्का बसला असून, पोलीस वसाहतीत शोकाकुल वातावरण आहे.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय