DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत असताना कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढत होता. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून वारंवार केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत अधिकृत निवेदन सादर करत महागाई भत्ता वाढीची घोषणा केली. राज्य सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे. यामुळे सध्या ५५ टक्के असलेला महागाई भत्ता थेट ५८ टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय फरक पडणार आहे.


विशेषतः मध्यम व कनिष्ठ वेतन गटातील कर्मचाऱ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होईल. धुळवडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही भेट कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक रंगांची उधळण करणारी ठरली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच जुलै २०२५ पासून वाढीव दराने महागाई भत्ता ग्राह्य धरला जाईल. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जमा झालेली थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा केली जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही थकबाकी मार्च २०२६ मध्ये गुढीपाडव्याच्या सुमारास देण्यात येईल. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळणार आहे.


वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून नियमितपणे रोखीने देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र शासकीय आदेश काढले जाणार असून, संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील. या निर्णयामुळे केवळ कार्यरत कर्मचारीच नव्हे तर सुमारे ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनाही फायदा होणार आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनातही वाढ होणार असल्याने हा निर्णय व्यापक स्वरूपाचा ठरतो. दरम्यान, केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पुढील दोन वर्षांत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही भविष्यात वेतनवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. सध्या मात्र महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आणि आर्थिक स्थैर्य देणारा टप्पा मानला जात आहे.

Comments
Add Comment

Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Pune Rain : मुसळधार पावसाचा फटका! भीमाशंकरचा संपर्क तुटला; दोन्ही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुणे : पुणे (Pune) जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील