महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा प्रकाशन सोहळा नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.


मंडळाच्या स्थापनेपासून ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गंभीर, वैचारिक, संशोधनपर आणि मौलिक विषयांवरील ग्रंथनिर्मिती सातत्याने केली जात आहे. खासगी प्रकाशकांकडून सहसा प्रकाशित न होणारे उच्च दर्जाचे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची जबाबदारी मंडळ पार पाडत आहे. आजवर मंडळाने ७३० हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी नव्या ग्रंथांचे प्रकाशन करण्याची परंपरा जपली आहे.



संत, साहित्य, इतिहास आणि संगीताचा वैविध्यपूर्ण पट :


यंदाच्या ४२ ग्रंथांमध्ये विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण साहित्याचा समावेश आहे. वारकरी परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुकारामबावांच्या अभंगाची गाथा’ या ग्रंथाचा समावेश विशेष उल्लेखनीय आहे. तसेच अंजली मालकर लिखित ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध) या दोन खंडांत तेराव्या शतकापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या संगीत प्रवासाचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे.


मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ हे तीन खंड प्रकाशित होत असून, त्यातील तिसऱ्या खंडात त्यांनी प्रथम मुद्रित केलेली ‘ज्ञानेश्वरी’ समाविष्ट आहे.


‘शिवशक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार विद्वत्तेचा महामेरु डॉ. सी. डी. देशमुख’, ‘मराठीतील रहस्य-रंजनप्रधान लोकप्रिय कादंबरी परंपरा आणि प्रवाह’, तसेच ओडिसी नृत्यशैलीवरील ‘ओद्रमागधी ते ओडिसी नृत्य – एक प्रवास’ हेही ग्रंथ प्रकाशित होत आहेत.



साहित्यिक परिचय मालिका:


१९४० ते १९९० या कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यिकांवर आधारित परिचयात्मक ग्रंथमालिकेतील ग्रंथांचाही समावेश आहे. यात पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे आदी साहित्यिकांच्या जीवन व साहित्याचा मागोवा घेण्यात आला आहे.


तसेच ‘रायगडची जीवनकथा’ या ग्रंथाचे आठवे पुनर्मुद्रण प्रकाशित होत असून या ग्रंथाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.



नवलेखकांना संधी :


मंडळाच्या ‘नवलेखक अनुदान’ योजनेअंतर्गत यंदा १९ नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित होत आहेत. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, ललितगद्य आणि बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारांतील ही पुस्तके असून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.



ग्रंथ ऑनलाईनही उपलब्ध :


मंडळाचे सर्व ग्रंथ https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शासकीय मुद्रणालय व खाजगी वितरकांकडेही अत्यल्प दरात हे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.


मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशन सोहळ्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

IAF Officer Wife Video : धक्कादायक! हवाई दल अधिकाऱ्याच्या पत्नीचा बलात्कार, ब्लॅकमेल आणि सक्तीच्या धर्मांतराचा आरोप

नागपूर : नागपुरात (Nagpur) एका २४ वर्षीय महिलेने तिच्या जुन्या वर्गमित्रासह तिघांविरुद्ध बलात्कार (Rape), ब्लॅकमेल (Blackmail),

Pratap Sarnaik : आता प्रत्येक ५० किलोमीटरवर 'आरटीओ ऑफिस'; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

- कमी लोकसंख्येच्या ठिकाणी चार तालुक्यांना एकत्र सेवा मुंबई : राज्यातील वाढती वाहनसंख्या आणि नागरिकांची गरज

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान

CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा

Former BJP MLA Patlya Guruji : भाजपाचे माजी आमदार पटल्या गुरुजी काळाच्या पडद्याआड; मेळघाटच्या ज्येष्ठ नेत्याला अखेरचा निरोप, सर्वत्र हळहळ

अमरावती : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते पटल्या

A 'death trap' in Tandulwadi : १० वर्षांपूर्वीचा भीषण इतिहास पुन्हा; ८ जणांचा जीव घेणाऱ्या विहिरीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा?

माळशिरस (सोलापूर): म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप