ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाविरोधात व समर्थनार्थ उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सोमवारी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर या याचिकांवर मंगळवारपासून सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारने पुढील आठवड्यापासून याचिकांवर सुनावणी घेण्याची सूचना केल्यानंतर सुनावणी नेमकी कधीपासून घेणार हे न्यायालय दुपारी ३ वाजता स्पष्ट करण्याची शक्यता आहे.


सरकारच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या याचिकांमध्ये किरकोळ त्रुटी असल्याची व काही मागण्या योग्य स्वरूपात नसल्याची बाब मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, याचिकांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी व काही मागण्या योग्य स्वरूपात मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडे केली गेली.


आतापर्यंत सात जणांच्या आत्महत्या : दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा अध्यादेश सरकारने काढल्यानंतर आतापर्यंत सातजणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे, सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी मागील सुनावणीच्या वेळी केली होती. तथापि, त्यावेळी न्यायालयाने याचिकांवर तातडीने सुनावणीला नकार दिला होता.


त्याचवेळी, काही न्यायिक कारणास्तव या याचिकांवर ६ ऑक्टोबरपूर्वी सुनावणी घेणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी ओबीसी प्रवर्गातून देण्यात येणाऱ्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सोमवारी सुनावणी झाली. तेव्हा, न्यायालयाने या याचिकांवर मंगळवारपासून सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय