'चड्डी-बनियान गँग' म्हणताच आमदार निलेश राणे आदित्य ठाकरेंवर कडाडले: "हिंमत असेल तर स्पष्ट बोला!"

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेत आज (सोमवार, ११ जुलै २०२५) एक वेगळाच राजकीय 'ड्रामा' पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात 'चड्डी-बनियान गँग' असा उल्लेख करताच, भाजप आमदार निलेश राणे अक्षरशः संतापले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

"नेमकी त्यांची चड्डी कोण, आणि बनियान कोण?"


आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या या शब्दांवरून निलेश राणे चांगलेच चवताळले. ते म्हणाले, "त्या आदित्यने हे जे काही शब्द वापरले, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण आणि त्यांची बनियान कोण? हे एकदा त्यांनी सांगावं ना!"


'हिम्मत असेल तर स्पष्ट करा'


राणे पुढे म्हणाले, "जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे नाहीत असे शब्द. कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते? उगाच टीका करायची म्हणून काहीही करायची का?"

"एक तासापासून आम्ही ऐकत आहोत, काही बोललो नाही. हे शब्द कुठले? रुलिंगमधून शब्द हे काढून टाकावे या तर त्यांनी स्पष्ट करावं. हिम्मत असेल तर नेमकं कोणाबद्दल बोलले ते स्पष्ट करावं," असे आव्हानही निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिले.

आदित्य ठाकरेंनी नेमका कोणाकडे उद्देशून हा शब्दप्रयोग केला होता, हे स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या या विधानावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र होते.
Comments
Add Comment

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात