'चड्डी-बनियान गँग' म्हणताच आमदार निलेश राणे आदित्य ठाकरेंवर कडाडले: "हिंमत असेल तर स्पष्ट बोला!"

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेत आज (सोमवार, ११ जुलै २०२५) एक वेगळाच राजकीय 'ड्रामा' पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात 'चड्डी-बनियान गँग' असा उल्लेख करताच, भाजप आमदार निलेश राणे अक्षरशः संतापले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

"नेमकी त्यांची चड्डी कोण, आणि बनियान कोण?"


आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या या शब्दांवरून निलेश राणे चांगलेच चवताळले. ते म्हणाले, "त्या आदित्यने हे जे काही शब्द वापरले, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण आणि त्यांची बनियान कोण? हे एकदा त्यांनी सांगावं ना!"


'हिम्मत असेल तर स्पष्ट करा'


राणे पुढे म्हणाले, "जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे नाहीत असे शब्द. कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते? उगाच टीका करायची म्हणून काहीही करायची का?"

"एक तासापासून आम्ही ऐकत आहोत, काही बोललो नाही. हे शब्द कुठले? रुलिंगमधून शब्द हे काढून टाकावे या तर त्यांनी स्पष्ट करावं. हिम्मत असेल तर नेमकं कोणाबद्दल बोलले ते स्पष्ट करावं," असे आव्हानही निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिले.

आदित्य ठाकरेंनी नेमका कोणाकडे उद्देशून हा शब्दप्रयोग केला होता, हे स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या या विधानावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र होते.
Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील