'चड्डी-बनियान गँग' म्हणताच आमदार निलेश राणे आदित्य ठाकरेंवर कडाडले: "हिंमत असेल तर स्पष्ट बोला!"

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेत आज (सोमवार, ११ जुलै २०२५) एक वेगळाच राजकीय 'ड्रामा' पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात 'चड्डी-बनियान गँग' असा उल्लेख करताच, भाजप आमदार निलेश राणे अक्षरशः संतापले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

"नेमकी त्यांची चड्डी कोण, आणि बनियान कोण?"


आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या या शब्दांवरून निलेश राणे चांगलेच चवताळले. ते म्हणाले, "त्या आदित्यने हे जे काही शब्द वापरले, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण आणि त्यांची बनियान कोण? हे एकदा त्यांनी सांगावं ना!"


'हिम्मत असेल तर स्पष्ट करा'


राणे पुढे म्हणाले, "जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे नाहीत असे शब्द. कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते? उगाच टीका करायची म्हणून काहीही करायची का?"

"एक तासापासून आम्ही ऐकत आहोत, काही बोललो नाही. हे शब्द कुठले? रुलिंगमधून शब्द हे काढून टाकावे या तर त्यांनी स्पष्ट करावं. हिम्मत असेल तर नेमकं कोणाबद्दल बोलले ते स्पष्ट करावं," असे आव्हानही निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिले.

आदित्य ठाकरेंनी नेमका कोणाकडे उद्देशून हा शब्दप्रयोग केला होता, हे स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या या विधानावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र होते.
Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण