धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे. संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा आदर राखतानाच, त्याचा गैरवापर रोखणे ही काळाची गरज आहे," अशी ठाम भूमिका भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत मांडली. राज्य सरकारने सादर केलेल्या 'धर्मस्वातंत्र्य विधेयकावर' बोलताना त्यांनी या कायद्याचे स्वागत केले आणि महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कडक कायद्याची आवश्यकता का होती, याचे सविस्तर विश्लेषण केले.


दरेकर यांनी नमूद केले की, देशातील इतर अनेक राज्यांनी यापूर्वीच असे कायदे केले आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेकडूनही गेल्या अनेक वर्षांपासून अशा मागणीचा पाठपुरावा केला जात होता. विशेषतः गरीब, वंचित आणि अशिक्षित घटकांना लक्ष्य करून, प्रलोभने देऊन किंवा भीती दाखवून केले जाणारे धर्मांतर हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून सामाजिक सलोखा बिघडवणारे षडयंत्र आहे. तरुण मुलींना खोटी नावे सांगून, हिंदू असल्याचे भासवून लग्नाच्या जाळ्यात ओढले जाते आणि नंतर धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार केले जातात, अशा घटनांमुळे राज्यात वारंवार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हे विधेयक अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या विधेयकातील सर्वात महत्त्वाच्या तरतुदीवर प्रकाश टाकताना दरेकर म्हणाले की, बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या विवाहामुळे जन्मलेल्या मुलांच्या भवितव्याचा सरकारने सकारात्मक विचार केला आहे. अशा विवाहातून जन्माला आलेले मूल हे आईच्या मूळ धर्माचे मानले जाईल आणि त्याला वडिलांच्या मालमत्तेवर वारसा हक्कही मिळेल, ही तरतूद अत्यंत क्रांतिकारी आहे. यामुळे मुलांच्या कस्टडीचा आणि संगोपनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच, या कायद्यात दोषींना सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाखांपर्यंत दंडाची तरतूद असली तरी, भविष्यात गरज पडल्यास ही शिक्षा आणखी कठोर करावी लागेल, असेही त्यांनी सुचवले.


शेवटी, या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बोलताना त्यांनी गृह विभागाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या. "केवळ फसवणूक झालेल्या व्यक्तीनेच तक्रार करावी अशी अट न ठेवता, समाजातील कोणत्याही घटकाने माहिती दिल्यास पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करावी," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, निरपराध लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत असतानाच, पीडित महिला आणि वंचित घटकांना तातडीने कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारने पार पाडावी, असे आवाहन त्यांनी या चर्चेदरम्यान केले.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.