मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख रस्ते आणि रहदारीचे मार्ग समतल करावेत. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करून ते अधिक सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी सक्षम करावेत, अशी मागणी उप महापौर संजय घाडी यांनी केली आहे.


मुंबई महानगरातील रस्ते अधिक सुरक्षित, समतल व वाहतुकीसाठी सुकर व्हावेत या उद्देशाने उप महापौर संजय घाडी यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात घाडी यांनी महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.


या निवेदनात म्‍हटले आहे की, मुंबई देशातील आर्थिक, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे महानगर आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतून जाणारा पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, विविध ठिकाणचे मुख्‍य रस्‍ते, रहदारीचे रस्ते आदींवर खड्डे उद्भवले होते. पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच काही उड्डाणपुलांच्‍या परिरक्षणाची जबाबदारी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित नव्हती. दोन वर्षापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्ग व उड्डाणपुलांच्या देखभालीचे जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे सोपविण्‍यात आली.


त्‍यानंतर, महानगरपालिकेच्‍यावतीने रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजविण्यात आले. त्‍यामुळे काही ठिकाणी रस्‍त्‍यांचा भाग उंच - सखल झाला आहे. वाहनचालक, पादचारी तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडीला देखील सामाेरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर रस्‍ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घ्‍यावीत. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग व अन्य रस्ते समतल करावेत, अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी केली आहे. वाहनचालक आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्‍यासाठी महानगरपालिका कटीबद्ध असल्‍याचा विश्वासदेखील घाडी यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना