अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आता फडणवीसांचे लक्ष! स्वबळावर लढणार की काय? अमृता फडणवीस नेमक्या काय म्हणाल्या?

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महायुतीत रस्सीखेच वाढताना दिसत आहे. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी जोरदार पक्षप्रवेश सुरू केले असून, कार्यकर्त्यांनाही कामाला लावले आहे. यातच, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी पुण्यामध्येच केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.



पुण्याशी माझं खास नातं, कमतरतांची तक्रार करणार!


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी पुणे शहराशी आपलं खास नातं असल्याचं सांगितलं. "या शहरात माझी आजी राहते, त्यामुळे मला इथे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतं. येथील लोक आणि वातावरणाविषयी मला खूप आपुलकी वाटते. त्यामुळे मी दरवेळी इथे आल्यानंतर देवेंद्रजींना येथील कमतरतांबद्दल सांगत असते, काय सुधारणा करणे गरजेचे आहे? तसेच फडणवीस देखील पुण्याकडे तेवढंच लक्ष देतात," अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.



अजितदादा स्वबळावर लढणार?


दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार कामाला लागले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होईल की नाही, हे अजून स्पष्ट नाही, पण तुम्ही तयारीला लागा." पुणे महानगरपालिकेत हे आदेश देण्यात आल्याने, पुण्यात अजित पवारांचा पक्ष स्वबळावर लढणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.


या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यास, येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणखी रंगत येणार हे निश्चित!

Comments
Add Comment

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,