राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द


मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८० अधिनियम आणि कायदे रद्द करणारे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले असून सुशासन व सुलभ प्रशासकीय कामकाजासाठी हे कायदे रद्द करण्यात आले आहेत.


महाराष्ट्र राज्यातील विवक्षित अधिनियमांचे निरसन करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत सामान्य प्रशासन विभागाचे अँड आशिष शेलार यांनी मांडले. चर्चेअंती हे विधेयक मंजूर करण्यात आले. याबाबत शासनाची भूमिका मांडताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, संवैधानिक बदल, राज्याची पुनर्रचना, आणि नवीन कायद्यांची अधिनियमिती यामुळे महाराष्ट्रातील अनेक अधिनियम कालबाह्य झाले आहेत. त्यांचे संदर्भ टिकून राहिल्यामुळे संदिग्धता निर्माण होत आहे. म्हणून, राज्य शासनाने, महाराष्ट्र राज्यात अमलात असलेल्या सर्व राज्य कायद्यांचे परीक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे आणि जे वापरात नाहीत असे मुंबई अधिनियम, मुंबई विनियम, बंगाल विनियम, मध्य प्रांत व वऱ्हाड अधिनियम, हैद्राबाद अधिनियम आणि मध्य प्रदेश अधिनियम निरसित करण्याचे ठरविले आहे.


रद्द केलेले कायदे / अधिनियम


मुंबई अधिनियम २४, मध्य प्रांत वऱ्हाड अधिनियम ८, हैदराबाद अधिनियम १८ आणि मध्य प्रदेश ३ यांसह विनियोग अधिनियम २४ अशा एकूण ८० अधिनियमांचा यामध्ये समावेश आहे. बंगाल जलोढ व गाळ विनियमन १८२५, ऋण व्याज गहाण अभिसिकृती विनियमन १८२७, भडोच व खेडा यातील भार असलेल्या भूसंपत्तीबाबत अधिनियम १८७७, मुंबई अबकारी अधिनियम १८७८, बोस्टल शाळा अधिनियम १९२९, महाराष्ट्र अफू ओढण्याबाबत अधिनियम, मुंबई वैरण व धान्य नियंत्रण अधिनियम १९३९, मुंबई कापूस नियंत्रण अधिनियम १९४२, मुंबईचा फटक्याची शिक्षा रद्द करण्याबाबत अधिनियम १९५७अशा विविध कालबाह्य अधिनियमांचा यामध्ये समावेश आहे.

Comments
Add Comment

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७