गुजरात-चेन्नईमध्ये अंतिम लढत, जिंकणार कोण? पहा दोन्ही संघांची कामगिरी!

  265

मुंबई : गुजरात टायटन्स संघाने याआधी पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यावर्षी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता गतविजेते गुजरात टायटन्स आणि ४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रविवारी, २८ मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे.


दोन्ही बाजूला तगडे फलंदाज आहेत. शुभमन गिलसह मिलर, हार्दिक पंड्या, राशिद खान, शिखर भरत असे क्षमतावान फलंदाज गुजरातच्या ताफ्यात आहेत. तर चेन्नईचा संघही यात मागे नाही. देवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी अशी लांबलचक फलंदाजी त्यांच्याकडे आहे.


गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये गुजरात संघाने दमदार कामगिरी केली आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅप सुद्धा गुजरातकडेच आहे. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली आहे.


२६ मे रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातने मुंबईचा दारुण पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. तर मोहित शर्मा याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.


२३ मे रोजी झालेल्या क्वालिफायर १ च्या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.


२० मे रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीवर ७७ धावांनी दणदणीत विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जने ‘प्ले ऑफ’मध्ये थेट प्रवेश केला.



आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्याने झाली होती.


यंदाच्या हंगामात साखळी फेरीत खेळताना... (खालील लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर बातमी पहा)

 

> ३१ मार्च - पहिल्याच सामन्यात गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.


> ३ एप्रिल - चेन्नईने लखनऊवर रोमहर्षक विजय मिळवला.


> ४ एप्रिल - गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.


> ८ एप्रिल - चेन्नईने मुंबईचा सात विकेट्स राखून पराभव केला.


> ९ एप्रिल - कोलकात्याने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला.


> १२ एप्रिल - राजस्थानचा चेन्नईवर ३ धावांनी रोमांचक विजय


> १३ एप्रिल - गुजरातने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला.


> १६ एप्रिल - राजस्थानने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला.


> १७ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीवर बाजी.


> २१ एप्रिल - चेन्नईचा हैदराबादवर ७ विकेट राखून सुपर विजय.


> २२ एप्रिल - गुजरातचा लखनऊवर सात धावांनी विजय.


> २३ एप्रिल - चेन्नईचा कोलकात्यावर ४९ धावांनी सहज विजय.


> २५ एप्रिल - गुजरातचा मुंबईवर ५५ धावांनी विजय.


> २७ एप्रिल - ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखण्यात राजस्थान यशस्वी.


> २९ एप्रिल - गुजरातने कोलकाताचा सात विकेटने पराभव केला.


> ३० एप्रिल - पंजाबचा चेन्नईवर रोमांचक विजय.


> २ मे - दिल्लीने गुजरातला पाच धावांनी हरवले.


> ५ मे - गुजरातने राजस्थानवर नऊ विकेटने विजय मिळवला.


> ६ मे - चेन्नईने केला मुंबईचा सहा विकेटने पराभव.


> ७ मे - गुजरातने लखनऊचा ५६ धावांनी पराभव केला.


> १० मे - चेन्नईकडून दिल्ली सर


> १२ मे - मुंबईने वानखेडेवर गुजरातचा २७ धावांनी पराभव केला.


> १४ मे - कोलकाताचा चेन्नईवर ६ विकेट राखून सहज विजय.


> १५ मे - गुजरातने केला हैदराबादचा पराभव.


> २० मे - दिल्लीला झुकवत चेन्नईची आगेकूच.


> २१ मे - अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा पराभव केला.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र