Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीआमदार बच्चू कडु यांना मोठा दिलासा

आमदार बच्चू कडु यांना मोठा दिलासा

सत्र न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली

मुंबई: आमदार बच्चू कडु यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांची मंत्रालयातील आंदोलन प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी ३ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली असून कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली आहे

बच्चू कडुंनी २६ सप्टेंबर २०१८ रोजी एका सरकारी पोर्टलला विरोध करत आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर, कडू यांच्यावर मंत्रालयातील तत्कालीन संचालक असलेल्या जैन यांच्यासोबत शाब्दीक वाद करत मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. यानंतर या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, आता, कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -