मुंबई : आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधत शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता संगळे चांगलेच होणार असे वक्तव्य केले. दरम्यान, यावर भाजप नेते निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.
तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत तेच आता त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार. अशा प्रकारचे ट्वीट निलेश राणेंनी केले आहे.
तीस तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, YZ ज्यांना घाण म्हटलं त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे. याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 26, 2022